📖 जीवन तरंग
आत्मचरित्र – आठवणींचे राजवस्त्र
"जीवन प्रवासातल्या आठवणी.. जणू काही मी विणायला घेतल्या. प्रश्न पडला, 'कोणते धागे घ्यायचे?' एक-दोनच की सगळेच वापरायचे ?
म्हटलं एक काय, दोन काय.. वेचकच घेऊ. आधी विणू तर खरं. उमलली स्मृतींची हळवी फुले. एक धागा आशेचा, सुखाचा आनंदाचा.. दुसरा निराशेचा, दुःखाचा, अपयशाचा. सरळ, वाकडे, उभे, आडवे, तिरपे, बहुढंगी... सफेद, काळे, निळे, पिवळे, बहुरंगी. सगळेच कसे छान, सुंदर, प्रसन्न होते.. सगळेच माझ्याशी प्रेमांनी बोलत होते.
विणत गेलो तनमनाने, उल्हासाने.. गुंफण केली नाजूक तशी हळुवारपणे. धागे धाग्यात आपसूकच गुंफत गेले.. लक्षात आलं, वस्त्र आता आकारू लागलेलं... तरीही अजून काहीतरी बाकी राहिलेलं.
मी गुंफलेल्या या माळेतील अक्षरं माझ्या अंतकरणाच्या अंतःकोषाला स्पर्श करून जन्माला आली आहेत."
पुस्तकाविषयी
कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात (मार्च २०२० पासून) घरात मिळालेल्या विश्रांतीच्या क्षणांत मी माझ्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आतापर्यंत पैशांचा हिशोब केला, आता आठवणींचा हिशोब जुळवला. हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जीवनपट नाही, तर युवा पिढीला कठीण प्रसंगांवर मात करत यशाचे शिखर गाठण्यासाठी दिशा देणारे आहे.
प्रकाशन: ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते – दि. १२ डिसेंबर २०२१, गुरव ज्ञानी हॉल. पुस्तकाला पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे शब्दरूपी आशीर्वाद लाभले आहेत.
💬 वाचक प्रतिक्रिया
'जीवन तरंग' वाचून भारावलेल्या विविध क्षेत्रातील वाचक आणि सहकाऱ्यांचे मनोगत
निलेश
पेद्रेवाडी ग्रामस्थ
जीवनतरंग !!
पेद्रेवाडी गावच्या राजकीय इतिहासात दोन विशाल वटवृक्ष फोफावले, ज्यांनी रखरखत्या उन्हात, बरसणाऱ्या पावसात, थंडीत, भिंगरीसारखे गरगर फिरुन पेद्रेवाडी गावाला आकार, आणि उकार दिला.... गोर गरीब जनतेला छाया आपलेपणाची ऊब दिली. आधार दिला, हक्क दिले. आत्मभान हरवलेल्यांना जागृत केले. असे दोन कुटुंबवत्सल वृक्ष म्हणजे मा. बाळासाहेब शिंत्रे & दुसरे लक्ष्मण गाडे साहेब (मुंबई पोलीस) या दोन वटवृक्षांनी केलेल्या महान कार्याबद्दल काहीसं..
'सुन्या सुन्या मैफलीच्या हळव्या आठवणी पासून ते गगन सदन तेजोमय' त्या करारी प्रार्थनेपर्यंत. आणि त्या प्रार्थने पासून ते गंजल्या ओठास माझ्या, धार वज्राची मिळू दे, या मागण्या पर्यंतचा उंबरठयातला अबोल पण निश्चयी असा पारिजात म्हणजे श्री बाळासाहेब शिंत्रे लिखित 'जीवन तरंग' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मा. प्राध्यापक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक व कवी यांच्या शुभहस्ते दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी गुरव ज्ञानी हॉल येथे पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विजय नाहटा साहेब शिवसेना उपनेते व अध्यक्ष झोपडपट्टी सुधार मंडळ, मा श्री विठ्ठल मोरे साहेब जिल्हा प्रमुख नवी मुंबई, श्रीमती संध्याताई वढावकर ठाणे जिल्हा संपर्क संघटक, श्रीमती शिल्पाताई सरपोतदार अध्यक्ष शिव सहकार सेना, श्री नजहत शेख संचालक, श्री व्ही.डी.पाटील अध्यक्ष आरसीएफ एक्स-एम्पलॉइज सोशल फोरम आणि शारदा प्रकाशनचे मा.प्रा. संतोष राणे, सौ नेत्रा पाटील (ढवळे) नगरसेविका पनवेल महानगरपालिका अशा बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती लाभली.
पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, बाळासाहेबांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी श्री विजय नाहटा साहेब, श्री. विठ्ठल मोरेसाहेब व व्यासपीठावर सर्व पाहुण्यांनी बाळासाहेबांचे बालपणीचे दिवस, शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करत RCF मध्ये सीनियर फायनान्स मॅनेजर पर्यंतची वाटचाल याबद्दल फारच कौतुक व प्रसंशा केली. त्यांनी नोकरी करत करत सामाजिक क्षेत्रात व राजकारणात जी कामगिरी केली त्याचा तरुण पिढीने जरूर आदर्श घ्यावा असेही सांगितले.
त्यांची पत्नी सौ रंजना शिंत्रे या 1995 साली प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि तेव्हापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहून नवी मुंबईमध्ये काम करत आहे, त्यामुळे शिंत्रे कुटुंब हे शिवसेनेचे भाग भांडवल आहे असा उल्लेख श्री. नाहटा साहेब यांनी केला.
याप्रसंगी मा. प्रा. प्रवीण दवणे यांनी आपल्या पहाडी व कवीमय आवाजामध्ये बाळासाहेबांच्या पुस्तकाला अनुसरून जे तेजोमय भाषण केले, कवितानि आणि परिपूर्ण भाषणाने पूर्ण व्यासपीठ जिंकले... सरांच्या शब्दाचा पाऊस चालू झाला आणि ज्ञान सभागृह ज्ञानाने भरून वाहू लागलं...
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मा.श्री. कवी साहित्यकार श्रीकांत चव्हाण, आदर्श शिक्षक येणारे गुरुजी, आणि माझा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये आम्ही तिघेही भरून पावलो!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अरुण अहिरे आणि दिलीप ढवळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले. शेवटी जिल्हा संघटक सौ रंजना शिंत्रे यांनी आभार प्रदर्शनपर भाषणात: "सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा असेल हा परिजात आहे..." या कवितेच्या ओळी बोलून मॅडमनी सभागृहाची मनं जिंकली आणि कार्यक्रमाची सांगता केली!
जीवनकहानी वेगवेगळ्या प्रकारे प्रेरित करीत असते. या कहानीचे खरे नायक श्री. मा. बाळासाहेब आणि गाडे साहेब आहेत. अशा या महान माणसांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो. गणपती बाप्पा मोरया!! 🙏🙏
श्री. व्ही. डी. पाटील
अध्यक्ष, आर.सी.एफ. एक्स-एम्पलॉइज सोशल फोरम
आपले 'जीवन तरंग' आत्मचरित्र वाचण्यास सुरुवात केल्यानंतर एवढे रंजक व ओघवते वाटले की, मी इतर सर्व कामे बाजूला ठेवून ते एकाच दिवसात (२०-२५ मिनिटे मध्ये झोप घेऊन) वाचून पूर्ण केले. आपण आपल्या आयुष्यावर उलगडताना ग्रामीण जीवनाचे सुंदर चित्रण, कोल्हापूरचा शाल तेव्हा मला दिसला केला, त्यामुळे हे पुस्तक वाचताना उत्कटता वाढत गेली.
आपले आत्मचरित्र वाचताना ६०-७० वर्षांचा माझ्या आयुष्याचा काळ रंगत आणि उभा राहिला व मला त्याचे मित्र असल्यासारखे वाटले. बघताबघता माझा जीवनप्रवास तुमच्याकडून ४-१० वर्षांनी पण वाखाणण्यायोग्य लगतच. खेड्यात कुटुंबामध्ये गावभाग, कोणी-कुठेही सुविधांचा आभाव पाहून शिक्षणाचा महत्व पाहून मागे काढत शिक्षण पूर्ण करून, अशा प्रकारे मागे दिशादर्शनाचा आभाव पाहून मागे काढत काढत शिक्षण पूर्ण करून अशा कुणी.एस.आयू.तसेच आर.सी.एफ. कंपनीमध्ये नाव करून भविष्याची रेखा आखली. त्याला बाले-संबंध, मित्रपरिवार, डोंगराचे प्रेम व खेड, युवा-यांचा समतोल साधून हे पुस्तक वाचताना उकलते आहे असे जाणवले.
आपल्या आत्मचरित्राच्या वाचताना आपणास ही कल्पना पडत नाही की हे पुस्तक एकाच दिवसात वाचून पूर्ण करावे (इतके छान), मेहनतीने सुंदर लोकांकुल जिमठीव केलेल्या पुस्तकाला समाजाकडे सादर करणे सोपे नाही तर पुस्तक तयार करणे कठीण असते.
आपला स्नेहांकित,
विकास (व्ही. डी.) पाटील
श्रीकांत चव्हाण
ज्येष्ठ कवी व साहित्यिक, आदर्श शिक्षक
श्री बाळासाहेब वाकोजी शिंत्रे, कोपर खैरणे, नवी मुंबई – जीवन तरंग साठी अभिप्राय.
श्री बाळासाहेबांच्या 'जीवन तरंग' वाचण्यास खूप आनंद झाला. मी पाहिलेले अतिशय शांत आणि मनमिळावू बाळासाहेब इतके सुंदर लेखन करू शकतात, याबद्दल माझ्या मनात विश्वास नव्हता, पण आता माझा अभिमान द्विगुणित झाला.
आता थोडे 'जीवन तरंग' बद्दल सांगायचे म्हणजे, आपल्या आत्मकथेमध्ये रेखाटलेला त्यांचा जीवनपट समजून घेताना आम्हालाही आमच्या अनुभवाशी त्यांच्या आत्मकथेतील काहीसं कमालीची जवळीकता व्यक्तीशी असल्याचे जाणवत राहिले. लेखकाशी जमणार नाही असेच असते पण एक एक प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात; आपण प्रत्यक्ष ते जिवंत जगत आहात असा अनुभव घेतान आपण त्या प्रसंगात असाल असे वाटते.
काण्याचे म्हणाल तर बऱ्याच ठिकाणी लेखकाने त्याच्या जीवनात एक पुरुष स्त्रीला पण त्याला टेकते. पण ती पुरुष उलगड्याच्या शिखरावर पोहोचलो, पण मी तर लेखकाने त्या दृश्य प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यात आहे ते म्हणजे बाळासाहेब.
प्रत्येक आपल्या पत्नीला लग्नानंतर शिक्षण तर दिलेच पण निकाणी मग ते राजकारण असो वा समाजकारण किंवा अन्य कोणतेही क्षेत्र, ते आपल्या लाडक्या पत्नी म्हणजेच रंजनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, आम्हाला तर वाटते रंजनाताईंच्या जडणघडणीत त्यांच्या सहभागाचे महत्त्व अपार आहे.
'जीवन तरंग' मधील काळ साहेब खरेच काय कणखर आणि ते आपल्या जीवनाच्या उत्तरार्धाच्या मराठी साहित्यरूपी डोंगरावर आरोहण आरंभ केले, निश्चितपणे हे आत्मचरित्र अभ्यासणे व इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रेरक आणि दिशादर्शक आहे.
एकदरीत पंचविस वर्षांपर्यंत आपण कुठे एकत्र नाही होते पण मला तर वाटत होते आपला बैठकीचे तेव्हा आम्ही बघत असायचो आपणाकडे नेहमीच येण्याची इच्छा असायची. तो आनंद विशेष होता. तेव्हा आम्ही मात्र असेच की आपणाकडे वेळेत येऊन बैठक असायची.
व्ही. आर. खर्चे
निवृत्त शिक्षिका व स्नेही
श्री शिंत्रे साहेब,
आपके 'जीवन तरंग' हे आत्मचरित्रावरून पुस्तक वाचून. आपके संपूर्ण बालपण खेडगावातील गेले. तेजाच आपण आपले प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण कोणत्याही प्रकारच्या चांगला संधी न देता केले. हे सर्व आपल्या महात्मा असल्याची शिदोरी आणि जिद्दीमुळे!
या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांच्या विठ्ठलाच एक विचार – रंगत मनात डोकावली. आपल्याप्रमाणे आपले विद्यार्थी एवढे कष्ट मेहनत घेताना तर निश्चितपणे ते अमेरिकेत असले. भारताच्या इतरांमधे असणे, परंतु सर्व सुविधा पाठाशी घेऊन घेऊन मार्ग सापडला विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची मेहनत घेतली नसेल नाही. ध्यास या पिढीसाठी आपले हे पुस्तक निश्चितपणे प्रेरक आणि दिशादर्शक आहे. यात शंका नाही.
लक्ष्मीप्रसाद सरबतीच्या देखील वरदहस्त आपणावर आहेत. तसेच आपण वाणिज्यशाखेवर पदव्युत्तर पद्विधर, आयुष्यभर प्रेमळ आणि मर्दाची करीन बडावली केली आणि आता आयुष्याच्या उत्तरार्धाच्या मराठी साहित्यरूपी डोंगरावर आरोहण आरंभ केले, निश्चितपणे ही वाटचाल आणि अभिनव आहे.
एकदरीत पंचविस वर्षांपर्यंत आपण कुठे एकल कुटुंबाप्रमाणे राहत होते २०१७ मध्ये एकल कुडुंबाप्रमाणे राहिले नाही त्या आनंद विशेष होता. तेव्हा आम्ही बघत असायचो बैठकांत बघत असायचो आपणाकडे नेहमीच येण्याची इच्छा असायची. तो आनंद विशेष होता.
काही वाकांतर आपल्या अधिगिनी सौ. रंजना शिंत्रे ह्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. देखे जाण्याच्या इच्छेला तर वर मणखे पक्की वाकडी ती वार. काणीही परंतु पुणे प्रतीत नसे, हे सुद्धा आम्ही बघितलेले आहे. त्या नगरसेविका झाल्यामुळे आपल्या सुद्धा जबाबदाऱ्या वाढल्या.
बद्धता बद्धता हर्षदा, मिलिंद हे महाविद्यालयीन शिक्षण घेत लागले. वाढत्या वयाप्रमाणे मुलांचे विचार देखील बदलत. परंतु आपली मुले ह्या पिढीला आपणाकडे. अपवाद ठरली. ती इमानतेने तुमच्या दिनचर्येमध्ये मदत करण्याची. माझ्या शिक्षिका स्वभावानुसार मी मानकंड तैलाशी करायचे तेव्हा ते सांगतये, नाव, आई कुठे मीटिंगला गेले, आई कुठे गेली मेटिंगला, इतर प्रश्न विचारत असायचे आपल्या लेखा विभागाची नोकरी म्हणजे मोठी जबाबदारी. अशी असून देखील आपण समाजकार्याशी बेगडे दिले. नोकरीमध्ये सुद्धा मस्तूर प्रगती केली.
आपल्या ५२ अपार्टमेंट असोसिएशन च्या अकाऊंट आणि ऑडिट करून लक्ष घातले. आपण आपल्या सौभाग्यवती आणि दोन मुले आशा कुटुंबातील एकदर दारही व्यक्ती समाजकामी आहे. आज रोजी आपण उभयता शिवसेनेचे पत्त्यांची फार मोठी जबाबदारी पार पाडत आहोत. त्यांचा आम्हा सर्व स्नेह-बांधवांना अभिमान वाटतो.
असीच समाजसेवा आणि लेखन कार्य आपणाकडून होऊन आपण यशोशिखर गाठावे आणि निरामय आरोग्य लाभावे. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा.
सौ. व्ही. आर. खर्चे
वसंत ढवळे
रसिक वाचक
मा. शिंत्रे साहेब,
मी आपले 'जीवन तरंग' हे आत्मचरित्र अगदी मनःपूर्वक वाचले. पुस्तक वाचताना आस वाटला की ऱ्हावाड्या. सराईत तेरकाणाचे हे पुस्तक असावे कारण आपल्यातील शब्दांची सुंदर गुंफण आणि वाक्यरचना अतिशय उत्तम पद्धतीने मांडण झाले आहे.
प्रकाशन सोहळ्यामध्ये श्री. बोहरा साहेब बोललेले की पुस्तक वाचायला सहामहिने लागले लग्न करता येत नाहीत पण वाचायचा ओढ लागते. त्याचाच अर्थ असा की मला पुस्तक वाचनाची गरज झाली. मात्र मी तर म्हणे काय की काही मेझक्याचे वाचनाची ओढ लावणारे पुस्तक वाचनाची गरज झाली.
प्रकाशन सोहळ्यामध्ये कार्यक्रम बोललेले की ह्या पुस्तकातून त्यांचा जीवनप्रवाह जाणून घेण्यास आले तुम्हाला पुस्तक वाचनाचा रंगत नाही. मात्र मी तर म्हणे काय की काही मेझक्याचे लोकांना तो माहित असेल पण सर्वांनी हे पुस्तक वाचण्याचे पाड़ग त्यामुळे तुम्हाला संघर्ष माहित असेल.
श्री. दवणे साहेब बोललेले की हे पुस्तक तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल व ते अगदी सत्य आहे हे पुस्तक वाचल्यावर समजते.
असेच सुंदर लेखाणाची आपण हातून होत जावे हीच सदिच्छा.
सुरेश घाडगे
माजी सहकारी, वित्त विभाग, आर.सी.एफ.
वाचनाच्या बाबतीत मी खूप आळशी आहे. रोजचं वृत्तपत्र देखील मी पूर्णपणे कधी वाचत नाही. सकाळी आलेला लोकसत्ता उलटासुलटा करून ठळक बातम्या बघतो. खेळांच्या बातम्यावर नजर फिरवतो व नंतर संपादकीय पानावर काही आवडीचा लेख, उलटाचष्मा सदर बघतो व ठेवून देतो. हायस्कूलच्या जीवनात वि. स. खांडेकरांच्या काही कादंबऱ्या न थांबतां वाचून काढलेल्या आठवतंय. पण नंतर सायन्स स्ट्रीमला गेल्यामुळे तेही वाचन बंद झालं ते जवळजवळ निवृत्त होईपर्यंत. आता थोडावेळ वाचनास देत असतो व काही मनास उभारी वा प्रेरणादायी विदेशी लेखकांची पुस्तके वाचत असतो.
मराठीतलं म्हटलं तर परवा परवा "जीवन तरंग" हे पुस्तक आमच्या परममित्राने पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आमच्या हाती ठेवले. प्रकाशन सोहळा नामांकित साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाला होता व त्या पुस्तकातील महत्वाचे उतारे वाचून प्रवीण दवणेंनी आमच्या मित्राचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनिटे दिलखुलास कौतूक केलं होतं. त्यामुळं पुस्तक घरी आणल्यावर सवडीने वाचू म्हणून इतर पुस्तकांसोबत कपाटात ठेवून दिले. परवा ते बाहेर काढले व शेवटच्या पानावरचं शब्द रूपी आशीर्वाद पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे वाचले व प्रस्तावना वाचून पाठीमागून पुढे असा एक एक भाग वाचायला सुरवात केली.
आमचा वित्तविभागातील सहकारी मित्र असं काही लिखाण करेल असं कधी वाटलं नव्हते.
प्रत्येक भाग वाचताना आमचे मित्र समवयस्क असलेने आम्हालाही आमच्या भूतकाळात घेऊन गेले व त्याचा जीवनपट हा आमचाच आहे की काय असं वाचताना सतत वाटत राहिले. केवळ तीन दिवसात रोज एक दोन तास व तीन चार भाग असे करून संपूर्ण पुस्तक वाचून काढले.
लेखकाची स्मरणशक्ती, त्याचं वडिलधाऱ्यांवर, कुटुंबावर, गावकऱ्यांवर, शिक्षकांवर, मित्रांवर असलेले प्रेम व जिव्हाळा प्रत्येक भागांत दिसून येतो. लेखकाची भाषाशैली ओघवती असून पुस्तकातील प्रत्येक पात्रास व कथेस योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यामुळं पुस्तक एकदा हाती घेतलं की ते संपूर्ण वाचनाची ओढ लावते. कोणताही भाग कंटाळवाणा वाटत नाही. लेखकाने आपली जवळजवळ साठ वर्षांची जीवन कहाणी कथन केलीय पण ती नुकतीच घडलीय की काय असा भास होतो.
अर्थात लेखकाच्या जीवनात आलेल्या प्रत्येकाचा उल्लेख जरूर होता की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो.
लेखकांचे आपल्या गावाबद्दल वाटणारी आपुलकी व सामाजिक बांधिलकी पण ठळकपणे दिसते आणि लेखकाची नवीन ओळख करून देते.
आमच्या या नवोदित पण कसलेल्या लेखकास जीवन तरंगच्या यशासाठी व अशाच दर्जेदार लेखनासाठी खूप सदिच्छा!
श्री. सखाराम धों. तुरटे
अध्यक्ष, पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ
श्री. बाळासाहेब शिंत्रे यांच्या जीवन तरंग पुस्तकावर अभिप्राय कविता
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला
जीवन तरंगाची ही गाथा
भल्या बुऱ्यांची मांडलीस व्यथा
शहरात जाऊन : पदवीधर होऊन
विसरला नाहीस गावाला.
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला ।।१।।
भावकी गावकीचा राखलात मान
गावच रूप मांडलास छान
काढली गावाची कळ, दावला एकीच बळ
मारले सत्या मांगल्याला
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला ।।२।।
तुटक्या चपलास लावलीस पिन
गरिबाचा मांडलास जिन
जुन ते आठऊन, नव्यास पाठऊन
गुरू मानले यशवंत पर्टाला
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला ।।३।।
रंजनाशी केले तुम्ही लग्न
संसारात आले नाही विघ्न
भगव्याची शान धनुष्यबाण
हावात तुम्ही घेतला
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला ।।४।।
केली आर. सी. एफ ची नोकरी
मिळवली जन्माची भाकरी
ईमानी राहून, आठ प्रमोशन घेऊन
सिनियर फायनान्स मॅनेजर तुम्ही झाला
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला ।।५।।
पेंद्रेवाडी हो आपल गांव
नवी मुंबईत तुमच नांव
सखाराम लिहीतोय, अभिप्राय देतोय
बाळूचा बाळासाहेब तुम्ही झाला
बालु वाढव तुझी ही कला
जीवन तरंग आवडलाय मला ।।६।।
अभिप्राय :– श्री. सखाराम धों. तुरटे
मारुती कातकर
पेद्रेवाडी ग्रामस्थ
🙏 सन्माननीय गुरुवर्य श्री बाळासाहेब शिंत्रे यांना माझा सादर प्रणाम
पेद्रेवाडी सुंदरवाडी गावामधील अष्टपैलू खेळाडू पैकी आपण एक अष्टपैलू आहात. साहेब काल जो कार्यक्रम जीवन तरंग पुस्तक वितरण सोहळा झाला तो आपला नसून आमच्या पेद्रेवाडी करांचा आहे असंच काही दिसून आलं कारण आपल्या गावचा आनंद सोहळा होता बाळासाहेब प्रेमी सर्व मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते आपण पुस्तक रूपाने पेद्रेवाडीच्या प्रत्येक माणसाबद्दल त्याच्या गाठीभेटी बद्दल त्यांच्या कार्य कर्तुत्वयाबद्दल आपल्या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे मांडणी केली त्यामुळे प्रत्येक आपला नागरिक आनंदी होऊन गेला.
💐साहेब आपली यशोगाथा आपल्या गावासाठी अशीच राहावी आणि आपल्या गावचे नाव सातासमुद्रा पर्यंत पोचवण्याचे काम आपण सर्वजण करू आणि हा प्रवास इथेच न थांबता अखंडित रहावा यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो 🙏🌹🌷🌺💐
शितल देवरकर
पेद्रेवाडी ग्रामस्थ
हार्दिक अभिनंदन साहेब... 💐💐💐
सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो... ट्रेनिंगमुळे मला आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही... क्षमस्व!!!!
आम्हा सर्वांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. आदरणीय शिंत्रे साहेब आपण आपल्या जीवन प्रवासात अनेक चढ उतार पाहिले... अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी यशाची शिखरे काबीज केली आहेत... हाच जीवन प्रवास आज 'जीवन तरंग' च्या माध्यमातून सर्वासमोर उलगडला आहे.
आपले हे जीवन तरंग आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात तिळमात्र शंका नाही. तुम्हांला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!! 💐💐💐
शिवाजी शिंदे
वाचक
मी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवसीच पुस्तक घेतले होतं माझं वाचून पण झालं खूप छान. मी बरीच जीवनावर आधारित पुस्तके वाचली आहेत पण तुमच्या पुस्तकात घडून आणलेले म्हणजे (कृत्रिम) असे काही वाटले नाही सगळे प्रसंग प्रामाणिकपणे मांडले आहेत आणि तुम्ही आजी काका शिक्षक मित्र गरिबी परिस्थितीत काय भोगले ते कुठलेही दुःखात नाहीत तर सरळपणे सामना केला ते आणि खास करून गाव खेड्यातले सौंदर्य बालपण याचा चांगला मिलाप आहे त्यामुळे प्रत्येक वाचकाला आपल्या गावची व लहानपणाची आठवण येणारच आणि शहरातील मुलांना खेडेगांव पाहण्यासाठी ओढ लागेल यांत शंका नाही.
एकदंर सर्वच प्रसंग छान जुळून आणले बालपणापासून निवृत्ती पर्यंत सर्वच विषय छान मांडले खूप छान आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏💐💐💐
वसंत शिंत्रे
पेद्रेवाडी ग्रामस्थ
''जीवन तरंग'', लेखक-श्री. बाळासाहेब शिंत्रे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा मा. प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांच्या शुभ हस्ते पार पडला. सदर कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला.
''तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो'' खरतर तुमच्या आजी आजोबाची नावे माझ्या आईवडीलांच्या नावासारखी आहेत हे आता मला कळले. खरतर मी आज जो कांही आहे त्यामागे माझे आई वडील तसेच कुटुंबियांच्या आशीर्वादासह, आपण म्हणजे 1) श्री. बाळासाहेब शिंत्रे व 2) कै. शामराव कातकर यांच्या पाठींब्याने आहे. माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तसेच नोकरीचे वेळी आपण दोघानी मला भरपूर मदत केली आहे. त्यामुळे मी आपला फार ऋणी आहे. तसेच तुम्ही माझे आधारस्तंभ व आदर्श आहात.
''जीवन तरंग'' हे पूर्ण पुस्तक मी वाचले असून ते पूर्णत: जन्मभूमी व कर्मभूमी यावर आधारित आहे. मला असे वाटते की, आजरा तालुक्यातील मृत्युंजय कादंबरी, लेखक- कै. शिवाजी सावंत आणि आपण लिहिलेली ''जीवन तरंग'' ही वाचताना खाली ठेवूच नये असे वाटते. त्याप्रमाणे आपण लिहिलेली ''जीवन तरंग'' ही कादंबरी मी वाचून पूर्ण होईपर्यंत खाली ठेवलीच नाही.
आपण गावाबद्दल बरेच काही लिहिले आहे. साधारणपणे सन 1980-1985 पूर्वी ज्यांचे शिक्षण 10 वी पर्यंत झालेले असेल आणि ज्यांनी गावचे जीवन उपभोगलेले असेल त्यांनाच समजेल की, त्यावेळेचा गांव आणि आताचा गांव यात किती फरक आहे.
गोविंद चव्हाण
पेद्रेवाडी ग्रामस्थ
शंकर कातकर
पेद्रेवाडी ग्रामस्थ
सुधा चव्हाण
पेद्रेवाडी ग्रामस्थ
प्रकाश देवरकर
पेद्रेवाडी ग्रामस्थ